
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शेजारील देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या छंब आणि सियालकोट सेक्टरमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या दोन्ही ठिकाणच्या लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.