Experts Health Care Tips : चुकूनही या 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, होतील विषारी! एक्सपर्ट्स सांगतात...

अनेक गोष्टी एकत्र खाल्ल्याने त्यांची ताकद वाढते, तर काही गोष्टी एकत्र केल्याने अन्न विषारी होऊ शकते. याबाबत एक्सपर्ट्स काय म्हणतात जाणून घेऊया सविस्तर.
Experts Health Care Tips
Experts Health Care Tipsesakal

Experts Health Care Tips : शिजवून, उकळवून खाल्लेलं अन्न चागलं असतं असे म्हटले जाते. मात्र काही पदार्थ शिजवल्याने त्यातील पोषक तत्व मरून जातात. स्वयंपाकघरात असलेल्या सर्व मसालेदार किंवा औषधी वनस्पतींचे वेगवेगळे फायदे आहेत. मात्र अन्नाचे योग्य कॉम्बिनेशन आपल्याला माहिती असायला हवे. अनेक गोष्टी एकत्र खाल्ल्याने त्यांची ताकद वाढते, तर काही गोष्टी एकत्र केल्याने अन्न विषारी होऊ शकते. याबाबत एक्सपर्ट्स काय म्हणतात जाणून घेऊया सविस्तर.

तुम्ही ऐकलेच असेल की अनेक पदार्थ जास्त शिजवल्याने त्यांच्यातील पोषक तत्व नष्ट होतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी जास्त शिजवल्याने त्याचे रूपांतर विषारी पदार्थांत होते. काही गोष्टी कच्च्या चवीला छान लागतात, तर काही गोष्टी जास्त शिजवल्यानंतर आरोग्याला हानी पोहोचवतात. चला जाणून घेऊया की कोणते पदार्थ शिजवल्याने त्यांचे पोषक तत्व नष्ट होतात आणि ते विषारी बनतात.

Experts Health Care Tips
Cooking Tips : टॉमेटोमुळे भाजीला आलेला आंबटपणा कसा कमी कराल ?

मध

मध हा अनेक लोकांसाठी साखरेचा उत्तम पर्याय आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की स्वयंपाक करताना त्याचा वापर करावा. कच्च्या मधामध्ये साखर, पाणी, बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्वे सी, बी, डी, ई आणि के आणि इतर अनेक आवश्यक खनिजे असतात. मध गरम केल्याने त्याची गुणवत्ता खराब होते आणि एंजाइम कमी होतात. याव्यतिरिक्त, ते गरम केल्यास किंवा शिजवल्यास देखील ते विषारी बनू शकते, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Experts Health Care Tips
Health Care : आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

ब्रोकोली

ब्रोकोलीची भाजी करणे टाळावे. ब्रोकोली कच्ची खाणे चांगले आहे, कारण ते उकळण्याने व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे निघून जातात.

बदाम

बदाम हे सुपरफूड मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की बदाम कधीही भाजू नयेत कारण त्यामुळे त्यात असलेले हेल्दी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स खराब होतात. बदामाचे अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते रात्रभर भिजवून ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी ते खावे. (food tips)

Experts Health Care Tips
Experts Health Care Tips

शिमला मिरची

शिमला मिरची एक अशी भाजी आहे की जास्त शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, जे पाण्यात विरघळणारे पोषक असते. यामुळेच उष्णतेच्या संपर्कात आल्यावर त्याची शक्ती कमी होते. (Health)

बीटरूट

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि इतर अनेक पोषक घटक असतात जे जास्त आचेवर शिजवल्यास नष्ट होतात. यामुळेच तज्ज्ञ ते कच्चे खाण्याचा किंवा त्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. (Vegetable)

डिस्क्लेमर - वरील लेख तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com