Jalgaon Water Scarcity : नळाला 6 दिवसाने पाणी, तेही ‘मीटर’ने; सावखेडयाच्या‘अमृत’ची कहाणी

Jalgaon Water Scarcity : नागरिकांना चोवीस तास पाणी पुरवठा करायचा, त्याबदल्यात नागरिकांनी ‘वॉटरमीटर’ने बील अदा करायचे.
Water Scarcity
Water Scarcityesakal

Jalgaon Water Scarcity : नागरिकांना चोवीस तास पाणी पुरवठा करायचा, त्याबदल्यात नागरिकांनी ‘वॉटरमीटर’ने बील अदा करायचे. याच आधारावर शासनाने ‘अमृत’योजना लागू केली. सावखेडा ग्रामपंचायतीने ‘अमृत’योजनेतर्गंत जलवाहिनी टाकली परंतु २४ तास पाणी सोडाच पण नागरिकांना रोजही पाणी मिळत नाही.(Jalgaon water Scarcity Under Amrit Yojana water channel was laid but citizens do not get water in Sawkheda)

तब्बल सहा दिवसांनी या भागात पाणी येते, आता तेही ‘मीटर’ने घ्यावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांत अमृत योजनेविषयी तीव्र संताप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण योजनेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

मीटर बसविले

जळगाव शहरालगत हरिविठ्ठल नगर भागात सावखेडा ग्रामपंचायतीचा वाघनगर तसेच इतर परिसर येतो. या भागात ग्रामपंचायतीने ‘अमृत’ योजनेत जलवाहिनीचे काम पूर्णही झाले. या भागात अमृत योजनेतून पाणीपुरवठा होतो. मात्र ते रोज येत नाही ते सहा दिवसांआड होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी कायमच भटकंती करावी लागते.

नागरिक पाणी टंचाईशी सामना करीत जखमेवर मीठ ठरावे अशा पध्दतीने या भागात ग्रामपंचायतीने नळांना मीटर बसविले आहेत. तब्बल सहा दिवसांनी नळाला पाणी येते आणि तेही ‘मीटर’ने भरावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. (latest marathi news)

Water Scarcity
Jalgaon Lok Sabha Election 2024 : रावेरसाठी ॲड. पाटील, चौधरींची चर्चा; ॲड. रोहिणी खडसेंचा लोकसभा लढण्यास नकार

निर्णयाचे काय ?

‘अमृत’योजनेत २४ तास पाणी पुरवठा करण्यात येईल त्यानंतर मीटर बसविण्यात येईल असा शासनाचा निर्णय आहे. सावखेडा भागात मीटर बसविण्याचा मक्ता नागपूर येथील एका कंपनीला दिला आहे. त्यानुसार मीटर बसविण्याचे आदेश प्राप्त झाले. चार हजार नळकनेक्शनला मीटर बसविल्याचे सांगण्यात आले. जर रोज पाणीपुरवठा होत नसतांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असतांना मीटर का बसविले ? हा येथील नागरिकांचा प्रश्‍न आहे.

फसलेली ‘अमृत’योजना

सावखेडा भागात ‘अमृत’योजना करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून २०११ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. २०३२ मध्ये या भागातील लोकसंख्या १५ हजार होईल असा अंदाज धरुन योजना आखली गेली. मात्र हे काम पूर्ण होण्यापूर्वीच २०२२ मध्ये या परिसरातील लोकसंख्या १५ हजाराच्यावर झाली. त्यामुळे ‘अमृत’योजना असूनही रोज ऐवजी सहा दिवसाआड एक तासच पाणी पुरवठा होतो. एकुणच रोज पाणी देण्याची ही योजना या भागात फसल्याचे चित्र आहे.

Water Scarcity
Jalgaon Anganwadi Sevika : गावपातळीवर अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची : आमदार चिमणराव पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com