वरणगावला पुन्हा जलवाहिनी फुटली; युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू

चौफुली मार्गात वरणगावला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अवजड वाहनांच्या वजनाने फुटली
varangaon
varangaonsakal

वरणगाव : शहराला तापी नदीपात्राच्या काठावरून कठोरा पंपिंग हाउसच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी कठोरा, अंजनसोंडामार्गे वरणगावपर्यंत जलवाहिनी जमिनीमधून टाकण्यात आली आहे. मात्र, ही जलवाहिनी  अंजनसोंड्याजवळील चौरस्त्यावर फुटली असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. नगर परिषदेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, लवकरच पुरवठा सुरू होईल, असे पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे यांनी सांगितले.

varangaon
नांदेड : ‘दारू’ला रस्त्यातूनच फुटले पाय !

शहरातील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कठोरा येथील तापी नदीपात्राजवळील वरणगाव नगर परिषदेच्या पंपिग हाउसवरून कठोरा अंजनसोंडामार्गे अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची उचल केली जात आहे. परंतु बऱ्याच दिवसांपासून अंजनसोंडा गावाजवळ फुलगाव, आयुधनिर्माणी, चौफुली मार्गात वरणगावला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अवजड वाहनांच्या वजनाने फुटली असून, शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्या अनुषंगाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, लवकरच पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे अभियंता गणेश चाटे, पर्यवेक्षक गणेश तळेले यांनी सांगितले.

varangaon
जळगाव शहरासह जिल्ह्यात धूलिकणांमुळे दृश्‍यमानता कमी

जलवाहिनी फुटणे नित्याचे

शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी वरणगाव, अंजनसोंडा, युद्ध साहित्य कारखाना व फुलगाव या चारही गावांना जोडणाऱ्या चौफुली रस्त्याच्या खाली असल्याने या रस्त्यावरून अवजड वाहनांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे जलवाहिनी फुटणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत असतो. त्यामुळे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी नगर परिषदेने तत्काळ विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे.

varangaon
दिलासादायक : कोरोना बाधितांची जळगाव शहरासह जिल्ह्यात संख्या घटली !

लाखो लिटर पाण्याची नासाडी

वरणगाव शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी पंपिंग हाउस कठोरा ते जलशुद्धीकरण केंद्र सिद्धेश्वरनगरपर्यंत सुमारे सहा किलोमीटर टाकण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराने जलवाहिनी ठिकठिकाणी वळवली असल्याने त्यावर पाण्याचा अतिरिक्त भार येऊन फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उचल केलेल्या लाखो लिटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे. सर्वस्वी विषय पाणीपुरवठा अभियंता यांना माहित असताना दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने अंथरण्यात आलेल्या जलवाहिनेचे सर्वेक्षण जलशुद्धीकरण केंद्रापासून कठोरा नदीपात्राजवळील पंपिंग हाऊसपर्यंत करून फुटलेली जलवाहिनी हातोहात जोडणी केल्यास नक्कीच पाणीपुरवठा कमी दिवसांवर येईल आणि पाण्याचा अपव्यवदेखील थांबेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com