वेहळोलीत बर्ड फ्लू ; एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारणार

मंत्री केदार; विषाणू रोखण्यासाठी सारे प्रयत्न
 bird flu
bird flu sakal

रत्नागिरी : शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली. आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्या आहेत. या घटनेची गांभीर्याने दाखल घेत, पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने मारून विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेतली. हा व्हायरस कसा आला, याची शास्त्रीय माहिती घेऊन भविष्यात तो येणार नाही, यासाठी प्रयत्न आहेत. ग्रामीण भागातील तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत करणारा हा उद्योग आहे. या व्यवसायाला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे, असे मत राज्याचे पुनर्वसनमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केदार म्हणाले, की काल (ता. १७) शहापूर येथे ३०० कोंबड्या दगावल्या आहेत. या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे पथक पोचले. त्यांनी तपासणी सुरू केली आहे. सुमारे एक किलोमीटरचा परिसर ‘सील’ करण्यात आला आहे. या विषाणूचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज सायंकाळपर्यंत मिळेल. मात्र, बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित पथकाला देण्यात आल्या आहेत. काही काळात इतक्या तातडीने हा विषाणू कसा आला, याची माहिती घेऊन याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन नियम आणि ठरलेल्या निकषांचे योग्य पालन करण्यात आले आहे. तुम्हाला विश्वास देतो हा विषाणू वाढणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली. पक्षी २४ तासही जगत नाहीत, अशी परिस्थिती होते. राज्याला आणि उद्योगांना हे परवडणारे नाही आणि खबरदारी म्हणून एक किलोमीटर अंतरावरील पक्षी मारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मदतीची भूमिका

बर्ड फ्लूमुळे ज्या पोल्ट्री व्यावसायिकाचे नुकसान झाले आहे. त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे मदतीची भूमिका शासनाची आहे. विषाणू भविष्यात येणार नाहीत, त्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला सांभाळण्याची जबाबदारी शासनाची आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणारा हा उद्योग आहे. अलीकडे तरुण मुले मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार म्हणून या उद्योगाकडे वळू लागले. ही अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे मंत्री केदार यांनी या वेळी सांगितले.

दृष्टिक्षेपात

  • पक्षी २४ तासही जगत नाहीत

  • एक किलोमीटरचा परिसर ‘सील’

  • विषाणूचे नमुने तपासणीसाठी

  • व्यावसायिकांना मंत्र्यांचा दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com