Champions Trophy 2025 : भारत पाकिस्तानात तेव्हाच खेळेल जेव्हा.... अनुराग ठाकूर यांचं चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात मोठं वक्तव्य

Anurag Thakur
Anurag Thakur Big Statement Champions Trophy 2025esakal
Updated on

Champions Trophy 2025 Anurag Thakur Big Statement : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार का या प्रश्नावर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कडक प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतानं पाकिस्तानमध्ये येऊन खेळावं यासाठी जोर लावला आहे.

मात्र बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राहिलेल्या अनुराग ठाकूर यांनी शेजाऱ्यांना पुन्हा एकदा ठणकावलं. त्यांनी आपले शेजारी दहशतवादी कारवाया करणं बंद करतील त्याचवेळी भारत पाकिस्तानात खेळेल असं सांगितलं.

Anurag Thakur
Mumbai Indians: 'रोहितच्या नेतृत्वातही मुंबईने सलग 5 सामने हरलेत...', सेहवागचाही हार्दिकला पाठिंबा?

भारतीय संघाने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. गेल्या आशिया कपमध्ये यजमानपद पाकिस्तानात होतं. मात्र भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला अन् भारताचे सामने श्रीलंकेत खेळवावे लागले होते. याचबरोबर पाकिस्तानचे खेळाडू 2008 नंतर आयपीएलमध्ये देखील खेळलेले नाहीत.

26/11 चा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय क्रिकेट संबंध तोडून टाकले. भारत अन् पाकिस्तान फक्त आयसीसी ट्रॉफी आणि आशिया कपमध्येच एकमेकांविरूद्ध खेळतात.

पीसीबी एवढं का हात धुवून मागं लागलीये?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जसजशी जवळ येत आहे तसतसे भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार की नाही याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानात गेला तर त्याचा मोठा आर्थिक फायदा पीसीबीला होणार आहे. त्यामुळे पीसीबी हे भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

Anurag Thakur
IPL 2024: राज्याचा संघ सोडला, युवराजचा रेकॉर्ड मोडला अन् आता पंजाबचा तारणहारही ठरला; कोण आहे अशुतोष शर्मा?

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना देखील याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ठाकूर म्हणाले की, 'हा निर्णय बीसीसीआयला घ्यायचा आहे. मात्र मी ज्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो त्यावेळी मी म्हणालो होतो की दोन गोष्टी एकाचवेळी होऊ शकत नाहीत.

तुम्ही भारताविरूद्ध दहशतवादी कारवाया करता अन् भारतीय संघ तुमच्या देशात खेळावा अशी अपेक्षा करता. या दोन्ही गोष्टी एकाचवेळी होऊ शकत नाहीत. आधी तुम्ही भारतावर गोळीबार करणं, बॉम्ब फेकणं बंद करायला हवं. ज्यावेळी पाकिस्तान दहशतवादी कारवाया बंद करतील त्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळेल. हे माझं वैयक्तिक मत आहे.'

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.