चोराच्या उलट्या बोंबा! स्वत: चेक फेकून दिला अन् म्हणे भारतानं अपमान केला, पाकिस्तानच्या कर्णधाराचं रडगाणं

Asia Cup Final : आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दुबईत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ट्रॉफी आणि मेडलसह आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष स्टेजवरून निघून गेले.
India Vs Pakistan

Trophy Controversy Rocks Asia Cup Final, Pakistan Blames India

Esakal

Updated on

India Vs Pakistan: आशिया कपच्या सुरुवातीपासूनच भारत - पाक सामन्यावरून वाद सुरू झाला होता. भारताने पाकिस्तानविरुद्ध सामने खेळू नयेत अशी मागणी होत होती. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या मैदानातील कृत्यानंतरही नवे वाद झाले. तर अंतिम सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. भारतानं पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेत तिन्ही सामन्यात धूळ चारली. स्पर्धा जिंकल्यानंतर भारतानं आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे बराच वेळ नक्वी यांच्यासह इतरांना मैदानात हातावर हात ठेवून थांबावं लागलं. दरम्यान, शेवटी नक्वी हे आशिया कपची ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन गेले. यामुळे भारतीय संघाला विजय मिळूनही ट्रॉफी मिळाली नाही. या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर बोलताना पाकिस्तान संघाचा कर्णधार यानं भारतावरच आरोप केलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com