Jasprit Bumrah finishes a tight two-over spell
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Final Marathi News: भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये ८ फलंदाजांची फौज घेऊन मैदानावर उतरला आहे. हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून गोलंदाज अपेक्षित होता. पण, सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकू सिंगचा समावेश करून घेतला. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का नक्की बसला होता, कारण भारताकडे गोलंदाजीचे पर्याय कमी झाले होते. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हा एकमेव स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज संघात होता आणि त्याच्यासोबतीला शिवम दुबेने भार सांभाळला. पण, Death Overs मध्ये गोलंदाजीचा भार कोण सांभाळणार हा प्रश्न आता पडला आहे.