

India vs Pakistan
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला नियोजित वेळेनुसार कोलंबोमध्ये होणार आहे. या सामन्यावर स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी प्रश्नचिन्ह होते.
पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या संघाला हा सामना न खेळण्यास सांगण्यात आले होते. पण भारतीय संघाने आपली भूमिका स्पष्ट करत सामन्यासाठी मैदानात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. यानंतर रविवारी (१० फेब्रुवारी) आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात बैठक झाली. यानंतर पाकिस्तानने हा निर्णय मागे घेत सामना खेळण्याची तयारी दाखवली.