

Mumbai Indians | IPL 2026
Sakal
Mumbai Indians review meeting : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत सर्वात निराशाजनक कामगिरी झालेल्या संघांपैकी एक म्हणजे मुंबई इंडियन्स. पाचवेळच्या विजेत्या असलेल्या मुंबई इंडियन्सला या हंगामात १४ पैकी फक्त ४ सामनेच जिंकता आले. खरंतर गेल्या ६ वर्षापासून मुंबईला विजेतेपद जिंकता आलेले नाही, त्यातच २०२४ मध्ये झालेला नेतृत्व बदल सर्वात चर्चेत राहिला.
रोहित शर्माला (Rohit Sharma) काढून गुजरात टायटन्समधून ट्रेडच्या मार्फत पुन्हा संघात घेतलेल्या हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद देण्यात आले. पण २०२४ आणि २०२६ या दोन्ही वर्षी मुंबईची कामगिरी अत्यंत घसरली. त्यातही २०२६ मध्ये संघात अनेक दिग्गज असतानाही संघाला फारशी चांगली कामगिरी करता न आल्याने बरीच टीका संघाच्या निर्णयांवर झाली. यानंतर आता मुंबई इंडियन्स मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.