Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

Shubman Gill On India T20I Comeback: भारताचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल २०२५ च्या अखेरीसपासून भारताच्या टी२० संघातून बाहेर आहे. पण आयपीएल २०२६ मध्ये त्याची अफलातून कामगिरी झाली आहे. यानंतर त्याने आता भारताच्या टी२० संघातील पुनरागमनाबाबत भाष्य केले आहे.
Shubman Gill | IPL 2026 Final | RCB vs GT

Shubman Gill | IPL 2026 Final | RCB vs GT

Sakal

Updated on

भारताचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलसाठी (Shubman Gill) आयपीएल २०२६ स्पर्धाही (IPL 2026) खास ठरला आहे. त्याच्यासाठी ही स्पर्धा टी२० क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठीही महत्त्वाची होती. गिल आयपीएल २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने (GT) नेतृत्व करत असून त्याच्या नेतृत्वात संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात कर्णधार गिलच्याही कामगिरीचा मोठा वाटा राहिला आहे. त्याने १५ डावात ४८.१३ सरासरीने ७२२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या शतकाचाही समावेश आहे, जे त्याने क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध केले होते. दरम्यान, या कामगिरीमुळे गिलने पुन्हा एकदा भारताच्या टी२० संघाचे (India T20 Team) दार ठोठावले आहे.

<div class="paragraphs"><p>Shubman Gill | IPL 2026 Final | RCB vs GT</p></div>
IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com