

Tilak Varma on Vaibhav Sooryavanshi | IND A vs SL A
Sakal
रविवारी (२१ जून) भारत अ संघ आणि श्रीलंका अ संघात तिरंगी वनडे मालिकेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेत आत्तापर्यंत भारतासाठी उपकर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि कर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.
पण अद्याप १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) अपेक्षित छाप पाडता आलेली नाही. त्याने साखळी फेरीत आक्रमक सुरुवात केली, पण त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. याबाबत तिलक वर्माने भाष्य केले आहे.