U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

India vs England, U19 WC Final: १९ वर्षांखाली वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ४०० धावा पार करत इग्लंडसमोर भलंमोठं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने पावणेदोनशे धावा ठोकल्या, तर कर्णधार आयुष म्हात्रेने अर्धशतक केले.
Vaibhav Suryavanshi | U19 World Cup

Vaibhav Suryavanshi | U19 World Cup

Sakal

Updated on

India Sets Historic 412-Run Target for England: शुक्रवारी (६ फेब्रुवारी) १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना हरारेमध्ये भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात खेळला जात आहे.

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) विश्वविक्रमी शतकी खेळी केली आहे.

आता या सामन्यात विजय मिळवून वर्ल्ड कप (U19 World Cup) जिंकायचा असेल, तर इंग्लंडला ४११ धावा करण्यापासून थांबवण्याचे आव्हान भारतासमोर आहे, तर इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल, तर इतिहास घडवावा लागणार आहे. कारण अद्याप इतके मोठ्या लक्ष्याचा पाठलाग या स्पर्धेच्या इतिहासात झालेला नाही.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Suryavanshi | U19 World Cup</p></div>
U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com