भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या आणि त्रिपुराचं रणजी ट्रॉफीत प्रतिनिधित्व केलेल्या राजेश बानिक याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. वयाच्या ४० व्या वर्षी झालेल्या अपघाती मृत्यूने क्रिकेटविश्वात खळबळ उडालीय.
Former India U19 Cricketer Rajesh Banik Dies in Road Accident at 40 Tripura Cricket in Mourning

Former India U19 Cricketer Rajesh Banik Dies in Road Accident at 40 Tripura Cricket in Mourning

Esakal

Updated on

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. त्रिपुराचा माजी अष्टपैलू क्रिकेटर राजेश बानिक असं क्रिकेटपटूचं नाव आहे. त्रिपुरात आनंदनगर इथं त्याच्या गाडीचा अपघात झाला. बानिकने २००२-०३च्या हंगामात त्रिपुराकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं होतं. अंडर १६ राज्य संघाच्या निवड समितीतही राजेश बानिक होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com