India vs Australia Test Series : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर चार सामन्यांची मालिका खेळत आहे. टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे, ज्याला भारतीय क्रिकेट संघात चांगली कामगिरी करूनही संधी दिली जात नाही. कर्णधार रोहित शर्माने त्याला नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. कारण तो टीम इंडियातील राजकारणाचा बळी पडला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने या खेळाडूला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करून वादाला तोंड फोडले. टीम इंडियाचा 'चायनामन' फिरकीपटू कुलदीप यादव टीम इंडियातील राजकारणाचा बळी ठरला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. कुलदीप यादवने या सामन्यात एकूण 8 बळी घेतले आणि पहिल्या डावात उपयुक्त 40 धावा केल्या, ज्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली. यानंतर पुढच्याच सामन्यात कुलदीप यादवला वगळण्यात आले.
भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर क्रिकेटच्या सर्व दिग्गजांपासून चाहत्यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत कुलदीप यादवला कसोटी संघात पुनरागमन करता आलेले नाही. कुलदीप यादवने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील बहुतांश वेळ बेंचवर बसून पाणी पिण्यात देण्यात जात आहे.
कुलदीप यादवला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.
कुलदीप यादवने आतापर्यंत भारतासाठी 8 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 3 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. एवढा चांगला रेकॉर्ड असतानाही कुलदीप यादवला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यामुळे कसोटी संघाबाहेर राहावे लागले.
भारताला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यासाठी तीन फिरकी गोलंदाजांची गरज असताना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवची निवड करण्यात आली आहे. कसोटी संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यामुळे बहुतेक वेळा कुलदीप यादवकडे दुर्लक्ष झाले आहे. एकदिवसीय आणि टी-20 संघातही अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे कुलदीप यादवला खेळण्याची संधी दिली जात नाही, कारण कुलदीप यादवची फलंदाजी या सर्व खेळाडूंपेक्षा थोडी कमी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.