
Asia Cup 2025 IND vs PAK Match
ESakal
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रात्री ८ वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कप २०२५ मध्ये होणाऱ्या या सामन्याबाबत देशात बराच निषेध सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मैदानावर आमनेसामने येतील. पण देशात या सामन्यावर बहिष्कार टाकला जात आहे. लोक टीव्ही किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हा सामना पाहण्यासही विरोध करत आहेत. पण जर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी खेळण्यास नकार दिला तर भारत सुपर-४ साठी पात्र ठरेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.