

Ajinkya Rahane
sakal
अहमदाबाद : कोलकता संघासाठी प्लेऑफ फेरी गाठण्याची आशा दूर जात असली तरी त्यांचा कर्णधार अजिंक्य रहाणे आशावादी आहे. आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत. यातून मार्ग काढण्यासाठी अधिक पुढचा विचार न करता समोर असलेल्या एकेक सामन्याचा विचार करा आणि बिनधास्त खेळा, असा सल्ला त्याने आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.