RCB ची चूक अन् मुंबई इंडियन्ससह सर्व संघांना फटका... BCCI ऍक्शन मोडवर; तातडीची मिटिंग

BCCI Agenda Following Bengaluru Tragedy: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या आयपीएल २०२५ विजेतेपदाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागले होते. बंगळुरूमध्ये चाहत्यांची चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर आता बीसीसीआयने या सर्व गोष्टी गांभीर्याने घेतल्या आहेत.
RCB  | IPL 2025
RCB | IPL 2025Sakal
Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धा जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले होत. विजेतेपद मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी (४ जून) आरसीबी संघ बंगळुरूमध्ये सेलिब्रेशन करणार होता. त्यांची विजयी मिरवणूकही काढण्यात येणार होती, पण ट्रॅफीकच्या कारणाने ती रद्द करण्यात आलेली.

पण आरबीसी संघाचा एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सन्मान करण्यात आला. पण याचवेळी बाहेर मात्र मोठी दुर्घटना घडली. लाखोंच्या संख्येत आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये ११ जणांनी प्राण गमावले, तर अनेकजण जखमी झाले. त्यामुळे आरसीबी संघ, कर्नाटक सरकार आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनवर टीकाही झाली.

RCB  | IPL 2025
Bengaluru Stampede : 'RCB नं परवानगीशिवाय विजयोत्सवासाठी जगाला बोलावलं'; कर्नाटक सरकारनं हायकोर्टात स्पष्टच सांगितलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com