

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (२९ मार्च) मुंबई इंडियन्स संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदाबादला झालेल्या हंगामातील नवव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी पराभूत केले.
मुंबईला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केले होते. त्यामुळे दोन सामन्यांनंतरही मुंबई इंडियन्सच्या खात्यात अद्यापही शून्य पाँइंट्स आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्याचेही पुनरागमन झाले होत. त्याने या सामन्यातील पराभवामागील कारणही स्पष्ट केले आहे.