हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडतोय का? शार्दूल ठाकूरला सामान्यानंतर प्रश्न, काय म्हणाला वाचा

Hardik Pandya Leaving Mumbai Indians: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सच्या सामन्यात अनुपस्थित; शार्दूल ठाकूरने अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. मुंबईने पंजाब किंग्सवर विजय मिळवला, पण प्लेऑफची संधी धोक्यात.
Hardik Pandya Leaving Mumbai Indians

Hardik Pandya Leaving Mumbai Indians

esakal

Updated on

Hardik Pandya Leaving Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा ५८ वा सामना गुरुवारी मुंबई इंडियायन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स(Punjab Kings) यांच्यात धर्मशाळा येथे खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत २०० धावा केल्या. मात्र या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत मुंबई इंडियायन्सने ६ विकेट राखून थरारक विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियायन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनुपस्थित असल्याने जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले. मुंबईच्या विजयानंतर शार्दुल ठाकुरला (Shardul Thakur) हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com