IPL 2022 Controversy : आयपीएल 2022 मध्ये खेळा बरोबरच काही वादांमुळे पण मैदान चर्चेत राहिले आहे. आयपीएलच्या या हंगामात अनेक वाद पाहायला मिळाले, मात्र 3 मोठ्या वादांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय संघातील मोठे खेळाडू या वादात अडकले होते. आयपीएलच्या 15 हंगामामध्ये कोणत्या 3 वादांची सर्वाधिक चर्चा झाली ते पाहू.
पहिला वाद - दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हंगामाचा 34 वा सामना खेळला गेला. त्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि काही खेळाडूंमध्ये नो बॉल वरून वाद झाला होता. खेळादरम्यान एक फुल टॉस बॉल टाकला ज्याला दिल्लीचा संघ नो बॉल देण्याची मागणी करत होता. पंतने त्यानंतर फलंदाजांना पुढे न खेळण्यास सांगितले,या वरून पंत आणि शार्दुल ठाकूरला च फीचा दंड ठोठावण्यात आला.
दुसरा वाद - राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात, राजस्थानचा डाव संपल्यावर रियान पराग डगआउटकडे जात असताना हर्षल पटेल आणि त्याच्या मध्ये जोरदार बाचाबाची झाली. सामना संपल्यानंतर हर्षल पटेलने सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केले, मात्र रियानशी हस्तांदोलन केलं नाही. रियानने हात पुढे केला होता, पण हर्षल पटेलने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेला. दोघांच्या या वादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतल.
तिसरा वाद - विराट कोहलीचा LBW आऊट आयपीएल 2022 च्या 18 व्या सामन्यात हा वाद पेटला होता. विराट कोहलीला तिसऱ्या पंचाने एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. कोहलीला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिला, त्यानंतर त्याने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने अल्ट्रा एजची पाहणे केले. चेंडू बॅट आणि पॅडला एकाच वेळी आदळला आहे हे दिसून येत होत. तरीही विराटला आऊट देण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.