
२२ एप्रिल रोजी संपूर्ण भारताला धक्का बसला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेक जण पर्यटक होते. त्यामुळे भारतात हळहळ आणि संतापाची वाट उसळली. देशभरात याचे पडसाद उमटले असून सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.
याचदरम्यान भारतात इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळवली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यानही सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व स्टेडियमच्या आसपासचे हवाई क्षेत्र सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने अँटी ड्रोन सिस्टीम 'वज्र सुपर शॉट' सुरू केली आहे.