
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (४ मे) लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्सविरुद्ध ३७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनौचा हा ११ सामन्यांमधील ६ वा पराभव आहे. त्यामुळे लखनौ सध्या ५ विजयांसह १० गुणासह सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.
लखनौचे आव्हान अद्याप जिवंत असले, तरी त्यांचे आता तीन सामने बाकी आहेत. त्यामुळे लखनौला आता फक्त १६ पाँइंट्सपर्यंतच पोहचता येणार आहे. त्यामुळे त्यांना आता प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल, तर उर्वरित तिन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. याबाबत पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर लखनौचा कर्णधार रिषभ पंतने प्रतिक्रिया दिली आहे.