
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने खराब सुरुवातीनंतर मात्र सलग सहा सामने जिंकत दमदार पुनरागमन केले आणि प्लेऑफसाठीही दावेदारी ठोकली आहे.
मुंबईचे अद्याप २ साखळी सामने बाकी असून प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. त्यांनी अद्याप प्लेऑफमधील स्थान पक्के केले नसले, तरी त्यांच्याकडे संधी आहे. अशातच त्यांना संघात मोठे बदल करावे लागले आहे.