
रजत पाटीदार आता आरसीबीसाठी आयपीएल जेतेपद जिंकणारा आरसीबीचा पहिला कर्णधार बनला आहे. आरसीबीला पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे रजत पाटीदार पहिल्यांदाच आरसीबीचा कर्णधार बनला. पहिल्याच प्रयत्नात जेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला. असे म्हणता येईल की, विराट कोहली त्याच्या कर्णधारपदात जे काम करू शकला नाही ते रजतने करून दाखवले आहे. या विजयासह रजत पाटीदारने रोहित शर्माचीही बरोबरी केली आहे.