Virat Kohli: RCB च्या विजायनंतरही कसोटी क्रिकेटला विसरला नाही विराट; म्हणाला, हा जरी सर्वोत्तम क्षण असला, तरी...

RCB’s Virat Kohli on IPL 2025 Victory: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धा जिंकली. या विजयानंतर विराट भावूक झाला होता. पण असे असतानाही तो कसोटी क्रिकेटला मात्र विसरला नाही.
Virat Kohli | RCB
Virat Kohli | RCBSakal
Updated on

इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. बंगळुरू आयपीएलचे आठवे विजेते ठरले. मंगळवारी (३ जून) झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा विजय खास ठरला, कारण १८ वर्षांपासून ही स्पर्धा खेळणाऱ्या या संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. तसेच हा विजय विराट कोहलीसाठीही खूप खास ठरला.

विराट एकमेव खेळाडू आहे, जो १८ वर्षे बंगळुरूसाठी खेळत आहे. त्यामुळे १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विराटने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.

Virat Kohli | RCB
Virat Kohli: विराट अनुष्काच्या गळ्यात पडून रडला! RCB चे पहिल्या विजयानंतर जोरदार सेलिब्रेशन; Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com