चीनचा हा तर आपल्याविरुद्ध कट..! भारतीय खेळाडूंनी केला आरोप

sportsman over china.
sportsman over china.

नवी दिल्ली  : चिनी लष्काराविरुद्ध झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या आपल्या 20 जवानांना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉलचा माजी कर्णधार बायचुंग भुटिया क्रिकेपटू रोहित शर्मासह अनेक खेळाडूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गलवान खोऱ्यात देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या आपल्या जवानांना सलाम आणि त्यांच्याबद्दल मनापासून आदर आहे. सैनिकांपेक्षा कोणीही नि:स्वार्थी आणि धाडसी नाही. त्यांच्या कुटंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. आपल्या प्रार्थनांद्वारे त्यांना कठीण काळात शांती मिळेल, अशी भावना विराट कोहलीने व्यक्त केली आहे.

आपल्या देशाच्या सीमीचे संरक्षण करताना शहीद झालेले सैनिक हे खरेखुरे हिरो आहेत. देव त्यांच्या कुटुंबीयांना सामर्थ्य देओ, असे विराटच्या टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. 

भारतीय सैनिकांवरचा हा हल्ला नियोजित कट होता. भारतात असलेल्या चिनी लोकांना मायदेशी बोलवले होते, त्यामुळे आपल्या सैनिकांवरचा हल्ला हा नियोजित कट असल्याचे सिद्ध होते, असे बायचुंग भुटियाने म्हटले आहे. भारताचा हा माजी फुटबॉल कर्णधार पुढे म्हणतो, चीनच्या या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आपल्या सरकारने चोख प्रत्युत्तर द्यावे. चीनत्या पोकळ आक्रमतेसमोर कमी पडू नये. ऑलिंपिक ब्राँझपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बॅटमिंटनपटू सायना नेहवाल, क्रिकेटपटू शिखर धवन यांनीही शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com