आता नाटक करतायत, भारतीय जनता मूर्ख; Asia Cup Finalमध्ये हायव्होल्टेज ड्राम्यानंतर राऊतांची पोस्ट, VIDEO केला शेअर

Asia Cup Final Controversy : आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा मैदानात बघायला मिळाला. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावरही नाट्यमय घडामोडींवर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Sanjay Raut Reacts To Asia Cup Drama Says Public Fooled

Sanjay Raut Reacts To Asia Cup Drama Says Public Fooled

Esakal

Updated on

आशिया कपच्या अंतिम सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सामन्यात पराभवानंतर चिडलेल्या पाकिस्तानी कर्णधारानं बक्षीसाचा चेक फेकून दिला. तर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असलेल्या मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यानंतर नकवी हे ट्रॉफी अन् मेडल्स घेऊन मैदानातून निघून गेले. दरम्यान, या हायव्होल्टेज ड्राम्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही सगळी नाटकं असल्याचं म्हटलंय. तुमच्या रक्तात देशभक्ती होती तर पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरायलाच नको पाहिजे होतं असंही राऊत म्हणालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com