मुलांनो, लग्नाआधीच या ५ सवयी सोडून द्या नाहीतर...

लग्नानंतर विशेषत: मुलांना आपल्या अनेक सवयी बदलाव्या लागतात. त्या कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
boys must change thier bad habits before marriage
boys must change thier bad habits before marriage sakal

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी आहे. प्रत्येकजण आपल्या लग्नाबाबत फार उत्सूक असतो. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरवात असते. कधी कधी लग्नाआधीच्या काही सवयी बदलून घ्याव्या लागतात कारण लग्नाआधीचं आयुष्य स्वत:पुरतंच मर्यादीत असतं मात्र लग्न झाल्यानंतर तसं नसतं. पत्नी पत्नीने एकमेकांना समजून घेणे गरजेचे असतं. अशात लग्नानंतर स्वत:त बदल करणे अत्यावश्यक आहे. (boys must change thier bad habits before marriage)

लग्नानंतर विशेषत: मुलांना आपल्या अनेक सवयी बदलाव्या लागतात. त्या कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

boys must change thier bad habits before marriage
थकल्यावर किंवा आजारी असल्यावर डोळ्यात पाणी का येतं?

भूतकाळसोबत घेऊन वावरणे

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन आयुष्याची सुरवात करता,तेव्हा तुम्ही भूतकाळ दुर ठेवला पाहीजे.भूतकाळाचा हस्तक्षेप कदाचित तुमच्या नात्यात अडचणी निर्माण करू शकतात.सोबतच वर्तमान आपल्या जोडीदारासोबत दिलखुलास जगला पाहीजे.भूतकाळातील कोणतंही नातं तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मनात संशयांची भावना निर्माण करेल.

घरात कमी वेळ घालवणे

मुलं सहसा घरात कमी वेळ घालवतात. त्यांना मित्रांसोबत बाहेर फिरायला, लेट नाईट पार्टी करायला आवडते.मात्र लग्नानंतर मुलांनी ही सवय बदलायला हवी.आपला जोडीदार आपली घरी वाट पाहतोय, याचे भान मुलाने ठेवायला हवे. याशिवाय जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल, याचेही प्लॅनिंग करणे, गरजेचे आहे.

boys must change thier bad habits before marriage
लिंबू मिरची लावण्यामागे अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक कारण देखील आहे

घरकामास मदत करणे

मुलं लग्नाआधी सहसा घरकामास मदत करत नाही. यामागे एक कारण असंही आहे की पुरूषप्रधान संस्कृती असल्याने आई वडील सहसा मुलाला घरकाम सांगत नाही. मात्र लग्नानंतर मुलाने ही सवय बदलायला हवी. प्रत्येक जोडीदार मुलीला तिच्या पतीने घरकामास मदत केलेली आवडते.यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांना समजू घेण्यास तुम्हाला मदत होणार.

अस्वच्छता ठेवणे.

अनेकदा अस्वच्छता पती-पत्नीच्या भांडणाचे कारण असते.जर तुम्ही वस्तु जागेवर ठेवली नाही. मोजे, कपडे जागेवर ठेवत नसल्याने तुमची बेडरूम आणखी अस्वच्छ दिसू शकते.यामुळे तुमचा जोडीदार वैतागू शकतो. म्हणून ओला टॉवेल बेडवर न ठेवणे, कपडे, मोजे व्यवस्थित ठेवणे, बेडरूम स्वच्छ ठेवणे, तुमची जबाबदारी आहे.

कोणताही निर्णय परस्पर घेणे

कोणताही निर्णय परस्पर न घेता जोडीदाराच्या सहमतीने घ्या.तुमच्या आयुष्याचा ती एक महत्त्वाचा भाग आहे, हे समजून तीला महत्त्व द्या.यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com