आमरससोबत हे तीन पदार्थ कधीही खाऊ नका

आजपासून आमरसाचा हंगाम सुरू होतोय. अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याची सुरवात होते.
आमरस
आमरसsakal

आजपासून आमरसाचा हंगाम सुरू होतोय. अक्षय तृतीयेपासून आमरस खाण्याची सुरवात होते. सध्या बाजारात आंब्याची मागणी वाढली आहे. आंबा खावा पण त्यासोबतच आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. आंबा किंवा आमरसासोबत कोणत्या गोष्टी खाणे टाळावे, हे देखील लक्षात असू द्या. जर या संदर्भात दुर्लक्ष केले तर आरोग्य आणि त्वचेवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो.

आमरस
उष्णता वाढल्यावर ताकात 'या' पाच गोष्टी टाका आणि पोटाचे विकार कायमचे दूर पळवा

१. पाणी (water)
आमरसाचा आस्वाद घेतल्यानंतर कधीच पाणी पियू नये. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारण १५ मिनिटांनी त्यावर तिखट काहीतरी खा आणि मग पाणी प्या. शक्यतोवर आपण शेवटी आमरस घेत जेवण संपवित असतो. आणि त्यानंतर लगेच पाणी पित असतो पण हे चुकीचे आहे.

२. मसालेदार पदार्थ (spicy food)
जेव्हा जेवणात आपण आमरस खातो तेव्हा साधारण खूप मसाले भाज्या खाणे टाळावं. कारण आंबा पचायला जड असतो. अनेकांना आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते. त्यात मसालेदार पदार्थांमुळे आणखी ॲसिडीटीची होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणं टाळा

आमरस
'रुह की गिजा'; जाणून घ्या अत्तराचा इतिहास आणि महत्त्व

३. दही (curd)

दही कोणत्याही फळासोबत खाणे, चुकीचे आहे. कारण आयुर्वेदानुसार ते विरुद्ध अन्न म्हणून ओळखले जातात. आपण सहसा मँगो लस्सी सुद्धा पितो मात्र मँगो लस्सी पिण्यापेक्षा मँगो मिल्कशेक घेतल्यास हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com