पुरुषांवर का भाळतात स्त्रिया? खासकरुन अशा गोष्टींवर ठेवतात विश्वास

नातेसंबधात वारताना पुरुष सहज खोटे बोलून जातात आणि आश्चर्याचे म्हणजे महिला त्यावर विश्वास ठेवतात.
 Four Common Lies Women Believe About Men
Four Common Lies Women Believe About Mensakal

पुरुषांचे जग स्त्रीयांच्या जगापेक्षा वेगळे आहे. पुरुष-स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे.दोघेही एकमेकांशिवाय अपुर्ण आहे. नातेसंबधात वारताना अनेकदा असे आढळून आले की पुरुष सहज खोटे बोलून जातात आणि आश्चर्याचे म्हणजे महिला त्यावर विश्वास ठेवतात.

पुरुष जात ही खरोखरच अत्यंत सावध असते. पुरुष त्यांच्या जोडीदारासोबत सहज खोटे बोलतात. ते त्यांचे शब्द हुशारीने निवडतात आणि स्त्रीला त्यांच्या म्हणण्यावर सहज विश्वास ठेवतात. यात धक्कादायक म्हणजे स्त्रियांना याबाबत साधी कल्पनाही नसते की आपला माणूस आपल्याशी खोटे बोलत आहेत. काही निवडक खोटारडेपणा ज्यावर स्त्रिया पुरुषांबद्दल विश्वास ठेवतात, खालीलप्रमाणे- (4 Common Lies Women Believe About Men)

 Four Common Lies Women Believe About Men
असं बनवा डाळीचे वरण! शरीराला ठरेल फायदेशीर

पुरुष स्वत: खुप स्ट्राँग असल्याचे सांगतो

प्रत्येक माणूस स्ट्राँग असल्याचा अभिमान बाळगतो. बहुतेक स्त्रियांना अशा पुरुषासोबत राहण्यास आवडते कारण त्यामुळे स्वत:ला सुरक्षित समजतात पण प्रत्यक्षात पुरुषही स्त्रियांप्रमाणे नाजूक आणि कोमल मनाचे असतात. त्यांना भीतीही असते मात्र ते कधीच दाखवत नाही.

सुरक्षित सेक्स पद्धतीबाबत जागरूक असल्याचे सांगतात

काही पुरुष त्यांच्या जोडीदारांना खात्री देतात की ते सुरक्षित लैंगिक पद्धतींबद्दल जागरूक आणि जाणकार आहेत.मात्र प्रत्यक्षात सर्व पुरुषांना सुरक्षित लैंगिक पद्धती माहित नसतात. त्यांच्यापैकी काही फक्त माहिती असल्याचा आव दाखवतात.

 Four Common Lies Women Believe About Men
स्मार्टफोन, टीव्हीच्या जगात अशी घ्या मुलांच्या डोळ्यांची काळजी; वाचा Tips

स्वत:ला घडवण्याचे श्रेय स्वत:ला देतात

बरेच पुरुषस्वत:ला घडवण्याचे श्रेय स्वत:ला देतात त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी घेतलेल्या मेहनतीची बढाई मारतात. प्रत्यक्षात अनेकांना त्यांच्या पालकांचा आणि कुटुंबाचा खूप पाठिंबा असतो म्हणून अशा खोटारडेपणावर विश्वास ठेवणे हे केवळ अज्ञान आहे.

स्त्रियांचे कौतुक करणे

पुरुषांचा कल नेहमी बुद्धिमान असलेल्या स्त्रियांकडे जातो. ते स्त्रियांच्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतात आणि या गोष्टी स्त्रियांना आश्चर्यकारकपणे खास वाटतात पण एकदा लग्न झाल्यावर ते त्यांच्या बायकांना गृहीत धरतात, कारण त्यांना वाटते की, आता ते दोघेही आयुष्यासाठी बंधनात आहेत, नेहमी रोमँटिक गोष्टींवर लक्ष देणे योग्य नाही. विवाहानंतर पुरुषांमध्ये झालेल्या बदलांमुळए स्त्रिया निराशा होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com