लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गल्लीतले सगळे मिळून गावाच्या नावांच्या भेंड्या खेळायचो. त्यातही सगळ्यात जास्त शब्द हे ‘र’ वरून यायचे. कारण, शहरांची नावाच्या शेवटी पूर असायचं. भारतातील सर्वात जास्त गावं याच शब्दाने संपतात.
गावाची, शहरांची नावे तिथल्या प्रसिद्ध गोष्टींवरून ठेवली जातात. तसं पाहिलं तर, प्रत्येक शहराला विशिष्ट इतिहास आहे. कोल्हापूरात कोल्हासूर राक्षसाचा वध झाला म्हणून कोल्हापूर म्हणतात. तर, सोलापूर हे शहर सोळा गावांच्या एकत्रिकरणाने बनले आहे. त्यामुळे त्याला सोलापूर म्हणतात. पण या शहरांमध्ये पूर शब्द कॉमन आहे.
पूर हा शब्द कुठून आला. प्रत्येक नावामागे तो का लावला गेला याला एक इतिहास आहे. त्या शब्दाचा अर्थ काय याची माहिती घेऊयात.
चला लवकर, कोल्हापूर-सोलापूर गाडी भरली.. कोण हाय का अजून तिकीट घ्यायचं, असा आवाज दिवसभर बसमध्ये ऐकू येतो. तर उत्तर भारतातील अनेक शहरांची नावेही पूरनेच संपतात. जयपूर,उदयपूर, सुलतानपूर अशी नावे प्रसिद्ध आहेत.
असा हा पूर शब्द मुळचा मराठी नाहीच. तो संस्कृत शब्द आहे. संस्कृतमध्ये ‘पूर’ चा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो. त्यामुळे राजा जेव्हा आपल्या राज्याचे किंवा साम्राज्याचे नाव घेतो तेव्हा त्याच्या नावाच्या शेवटी पूर हा शब्द जोडत असे. जसे राजस्थानची सध्याची राजधानी जयपूरच्या बाबतीत घडले.
शहरांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडणे ही काही नवीन सवय नाही, तर ती शतकानुशतके जुनी परंपरा आहे. याचा पुरावा आपल्याला महाभारत काळातही सापडतो, जिथे हस्तिनापूर हे एक मोठे साम्राज्य होते. नंतर शहरांच्या किंवा राज्यांच्या नावांना पूर हा शब्द जोडण्याची परंपरा चालू राहिली.
आज या परंपरेचा परिणाम म्हणजे भारतातील जवळपास निम्म्या शहरांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडला गेला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की पूर हा शब्द अरबी भाषेतही आहे, जो अरबस्तानातून येणाऱ्या प्रवाशांसह भारतात पोहोचला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.