तुम्हाला जेवणानंतर आंघोळ करण्याची सवय आहे का ? बघा तज्ज्ञ काय सांगतायत

ही सवय चुकीची असल्याचे त्या सांगत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ही कृती आयुर्वेदानुसार अस्वस्थ क्रियांपैकी एक आहे. ही सवय म्हणजे त्वचारोगाचे मुख्य कारण आहे.
bath
bathgoogle

मुंबई : आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभानी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्या जेवणानंतर आंघोळ करण्याच्या सवयीबद्दल बोलत आहेत. ही सवय चुकीची असल्याचे त्या सांगत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ही कृती आयुर्वेदानुसार अस्वस्थ क्रियांपैकी एक आहे. ही सवय म्हणजे त्वचारोगाचे मुख्य कारण आहे.

bath
शौचानंतर धुण्याची भारतीय पद्धत योग्य की पुसण्याची पाश्चात्य पद्धत ?

जेवल्यानंतर आपल्या शरीराचे तापमान २ अंशांनी वाढते. यामुळे पचन होण्यास मदत होते. पचनक्रिया सुरू असताना रक्ताभिसरणही चांगले होत असते.

bath
हेल्थ वेल्थ : जेवणानंतर चालण्याचे फायदे!

डॉ. अपर्णा सांगतात की, आयुर्वेदानुसार जेवणानंतर आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळू शकत नाही. परिणामी शरीरात अनेक समस्या उद्भवतात. याउलट, आंघोळीनंतर जेवल्याने पोटभर जेवले जाते.

bath
जेवणानंतर चहा पिणं शरीरासाठी हानिकारक! जाणून घ्या

डॉ. अपर्णा सल्ला देतात की, जेवल्यानंतर २ ते ३ तास आंघोळ करू नये. तसेच नाश्ता केल्यानंतर १ तास आंघोळ करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com