नवी दिल्ली : देशभरात ऐन निवडणुकीच्या काळात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांनी मतदारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखायला सुरूवात केली आहे. केंद्र सरकारनेही राजकीय पक्षांचा प्रचार करणाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून तसे नियोजन आखण्याचीही सूचना करण्यात आली आहे. (lok sabha election 2024 heat wave affected election campaign measures are taken by administration)
भारतीय हवामान खात्याने यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल आणि मे या कालावधीत दीर्घकाळ उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच कालावधीत विविध टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होत असून त्यात प्रत्येक टप्पानिहाय उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचार फेऱ्या, जाहीर सभांचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. त्यात उन्हाचा कडाका लक्षात घेऊन नियोजनामध्ये बदलही केला जात आहे. उमेदवारांना आपल्या समर्थकांची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयोगानेही सर्व राज्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मतदानासाठी संभाव्य उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. अर्थात, यामध्ये राजकीय पक्षांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश नव्हता. भारतीय हवामान खात्याने एप्रिल ते मे या कालावधीत गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक, मध्यप्रदेशच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा अधिक ऊन जाणवू शकते असा अंदाज वर्तविला होता. (Marathi Tajya Batmya)
तीव्रता आणखी वाढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेचा कालावधी दोन ते चार दिवसांऐवजी थेट १० ते २० दिवसांपर्यंत राहू शकतो. विशेषतः दक्षिण भारत, मध्य भारत, पूर्वेकडील भाग आणि वायव्य भागातील मैदानी प्रदेशामध्ये याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांसोबतच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. (Latest Marathi News)
किमान सुविधा हव्यातच
उष्णतेच्या लाटेपासून मतदार आणि कर्मचाऱ्यांचा बचाव व्हावा म्हणून देखील केंद्र सरकारने राज्यांना काही सूचना केल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर किमान सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. मतदारांच्या रांगांच्या व्यवस्थापनासाठी एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट गाइडच्या स्वयंसेवकांची मदत घ्यावी, सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, पुरेशी आसन व्यवस्था ठेवली जावी तसेच वीजही उपलब्ध करून द्यावी असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.