PM मोदींवर जितकी जास्त टीका करतील, तितके ते जास्त खड्ड्यात पडतील; नीतेश राणेंचा विरोधकांवर निशाणा
'निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांना आता औरंगजेब आठवत आहेत. मोदींसोबत औरंगजेब यांची तुलना करून ते देशभरातील नागरिकांचा अपमान करत आहेत.'
कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Constituency) महायुतीच्या उमेदवाराबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या ४८ तास आधी जरी उमेदवार निश्चित झाला तरीही महायुतीचाच उमेदवार या मतदारसंघातून निवडून येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील जितकी जास्त टीका करतील, तितके ते जास्त खड्ड्यात पडतील, असा दावा आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी येथे केला.
आम्ही राज ठाकरेंना (Raj Thackeray) सोबत घेतले तर विरोधकांना मिरच्या का झोंबल्या, असाही सवाल त्यांनी केला. राणे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी यशस्वीपणे योजना राबविल्या आहेत. विविध योजनांचे फायदे थेट जनतेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार निवडून येईल याची खात्री आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांना आता औरंगजेब आठवत आहेत. मोदींसोबत औरंगजेब यांची तुलना करून ते देशभरातील नागरिकांचा अपमान करत आहेत. मात्र, मोदींच्या नावे तुम्ही जेवढी टीका कराल तेवढे तुम्ही खड्ड्यात जाल. हिंदुत्वाचा विचार भक्कम करण्यासाठी कुणी पुढे येत असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे. त्यासाठी आम्ही राज ठाकरे यांना सोबत घेतले आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.