पाच राज्यांच्या निकालात भाजपला भरघोस यश मिळाले. चार राज्यात भाजपची सत्ता आली. या सर्व निकालावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. अनेक नेतेमंडळीनी प्रतिक्रिया दिल्या. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाच राज्याच्या निकालावर भाष्य केले. पाच राज्याच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडुन आला नाही यावर शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नसल्याचे आठवले म्हणाले.
“सर्व राज्यामध्ये माझा पक्ष आहे. शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यात स्ट्राँग आहे. शिवसेनेला पाहिजे त्या राज्यामध्ये यश मिळणे अशक्य आहे” असे आठवले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये भाजप सोबतच शिवसेना राहली नाही तर त्यांच्या लोकसभेत तीनचार जागा निवडून येतील की नाही अशी शंका आहे. विधानसभेला तर शिवसेनेचं पूर्णपणे पानीपत होणार असल्याचेही ते म्हणाले.
“महाविकास आघाडी मध्ये जे पक्ष आहे ते एकमेकांच्या विरोधात जाणारे पक्ष आहे. शिवसेना भाजपशिवाय काही नाही. अजून ही वेळ गेलेली नाही, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येत अडीच अडीच वर्षे सरकार चालवावे” असेही आठवले म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.