भाजपची तयारी स्वबळाचीच! सेनेसोबत जाण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले...

चार राज्यातील विजयानंतर भाजपचा कॉन्फिडंन्स वाढला - चंद्रकांत पाटील
Chandrkant Patil
Chandrkant Patilsakal
Summary

चार राज्यातील विजयानंतर भाजपचा कॉन्फिडंन्स वाढला - चंद्रकांत पाटील

देशातील पाच राज्यांच्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपाने मुंसडी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आज भाजप ठिकठिकाणी जल्लोष साजरा करताना दिसत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरुच आहेत. या राज्यातील विजयावरून भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सकाळी आठ वाजता उठायचं आणि पंतप्रधान मोदींना शिव्या द्यायच्या, गेल्या 27 महिन्यामध्ये तुम्ही राज्यात काय केलं आहे हे जनतेनं पाहिले असल्याचा टोला त्यांनी खासदार संजय राऊत (Sanjau Raut) यांना लगावला आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

Chandrkant Patil
इंग्लंडवासीयांना हापूसची भुरळ; आता वैशिष्ट्येही पोहोचणार थेट परदेशात

चार राज्यात भाजपाने सत्ता मिळवली आता महाराष्ट्रात काय होणार या प्रश्नावर ते म्हणाले, आता महाराष्ट्रात काय होणार हे माहिती नाही, मात्र काय होणार हे जनतेला माहिती आहे. लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊ. शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले. गेल्या २७ महिन्यात त्यांच सत्ताधाऱ्यांच तोंड भाजलं आहे. त्यामुळे आता ते ताक ही फुंकुण पित आहेत. चार राज्यातील विजयानंतर भाजपचा कॉन्फिडंन्स वाढला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोणत्याही आघाडीसोबत जाण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पुढे ते म्हणाले, राजकारणामध्ये समाजाच्या आवश्यकतेपोटी समाजाच्या उपयोगी काम करावे लागते. आमच्या पार्टीमध्ये नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य करण्याची पद्धत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा नम्रपणा शिकवला आहे. संजय राऊत यांना सांगू इच्छितो की तुम्ही गोळाबेरीज करून मुख्यमंत्री केला. गेल्या 27 महिन्यामध्ये काय काम केला आहात हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले आहे. चार राज्यांत भाजपानं यश मिळवलं आहे. तुम्हाला मोदींबद्दल कधीच आदर वाटणार नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे.

महाआघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Sarkar) राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणातही भ्रष्टाचार केला आहे. मुंबई महापालिकाही भाजपाला जिंकायची असून लढाई सुरु झाली आहे. लढाई सोपी नाही परंतु पंतप्रधान मोदींनी शिकवलं आहे की, कार्य कठीण आहे म्हणून ते करायचे आहे. त्यांच्या याच नेतृत्वाने आम्ही पुढे चालणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Chandrkant Patil
'आधे से ज़्यादा भ्रम और...' निकालानंतर अखिलेश यादवांचं पहिलं ट्वीट चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com