Anil Deshmukh: सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही; भाजपप्रणीत सरकार शेतकरीविरोधी आहे!

आमदार अनिल देशमुख : संघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप
anil deshmukh
anil deshmukh

Anil Deshmukh: राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असताना त्यांना वाऱ्यावर सोडून देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्री राज्याबाहेर फिरत आहेत.

त्यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. भाजपप्रणीत सरकार शेतकरीविरोधी आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांना पेटत ठेवायचा आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते तथा माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर चढविला.

anil deshmukh
Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीने विधानसभेच्या जागा लढवेल

येत्या १२ डिसेंबरला नागपूर येथे संघर्ष यात्रेचा पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार असून त्याच्या नियोजनासाठी आमदार अनिल देशमुख बुधवारी (ता.२९) अमरावतीत आले होते.

त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार रमेश बंग, शहराध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, संगीता ठाकरे, गणेश रॉय व विनेश आडतिया उपस्थित होते. आमदार रोहीत पवार यांनी २४ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप नागपूर येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

anil deshmukh
Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल!

राज्यातील सत्ताधारी भाजपप्रणीत सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, सध्याच्या अवकाळी स्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. खरिपातील अतिवृष्टीची मदत अद्याप मिळालेली नाही, पीकविम्याचे प्रश्न कायम आहेत.

कापसाला भाव नाही, सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आहे. वर्ष २०१३ मध्ये फडणवीसांनी दिंडी मोर्चा काढला होता. सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागितला होता. पाच वर्षे ते मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना आता शेतकऱ्यांचे प्रश्न का दिसत नाहीत.

भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारनेच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, असा संघर्ष पेटविला आहे.

anil deshmukh
Anil Deshmukh:'मोदी राजकीय सोय बघून वक्तव्य करतात', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर अनिल देशमुखांची टीका

केंद्राने घटनादुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा १६ टक्क्यांपर्यंत वाढविल्यास हा मुद्दा सुटू शकणार आहे. मात्र त्यांना तो सोडवायचा नसून मराठा विरुद्ध ओबीसी, असा संघर्ष पेटता ठेवायचा आहे. अंतरवाली सराटीत मराठ्यांवर लाठीमार गृहमंत्र्यांच्या आदेशानेच झाला होता व त्यासंबंधीचा अहवाल खोटा असल्याचाही आरोप त्यांनी केला.

पाच डिसेंबरला ट्रॅक्टर मोर्चा

हिवाळी अधिवेशनापूर्वी पाच डिसेंबरला अमरावतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार असून त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

anil deshmukh
Anil Deshmukh: 'त्यांनीच जीआर काढला अन् त्यांनीच रद्द केला...', माजी गृहमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com