ठाकरे सरकारकडून नामांतरावर शिक्कामोर्तब, 'संभाजीनगर' व 'धाराशिव'चे प्रस्ताव मंजूर

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackerayesakal

Maharashtra Politics: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कॅबीनेट बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाहता उद्धव ठाकरे सरकारची ही कदाचित शेवटची बैठक होती. अद्याप बहुमताची चाचणी पेंडिंग आहे. मात्र, त्याआधीच ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. नामांतराचे दोन प्रस्ताव मंजूर झाले असून यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मंजूर झाली आहे. तसेच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

(Maharashtra Politics News Updates)

बैठकीत याशिवाय अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराशिवाय नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध विभागातील मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. त्यामध्ये कृषी, पाणी पुरवठा, नगरविकास, परिवहन अशा विभागांचा सामावेश आहे.

CM Uddhav Thackeray
पुण्याचं नाव जिजाऊ नगर करा; काँग्रेस नेत्यांची कॅबिनेटमध्ये मागणी

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता.

(सामान्य प्रशासन विभाग)

• उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.

(नगर विकास विभाग)

• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार

(विधि व न्याय विभाग)

• अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार

(परिवहन विभाग)

• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.

(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.

(नियोजन विभाग)

• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

( सामान्य प्रशासन विभाग)

• शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.

(महसूल विभाग)

CM Uddhav Thackeray
Maharashtra Politics LIVE: सभागृहाचा विश्वास समजण्यासाठी बहुमत चाचणी गरजेची - कौल

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंळाच्या बैठकीतील भाषणात ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानले असून उरलेले निर्णय पुढच्या बैठकीत घेण्याची घोषणा केली आहे. तर शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं असून उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण शेवटचं होतं का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com