
बीड, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक असून, बाधितांच्या संख्येत मागील पाच महिन्यात या जिल्ह्यांमध्ये 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
राज्यातील 'या' पाच जिल्हयांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 400 टक्क्यांनी वाढ
मुंबई : बीड, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक असून, बाधितांच्या संख्येत मागील पाच महिन्यात या जिल्ह्यांमध्ये 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
ही बातमी वाचली का? मोठी ब्रेकिंग! पंढरपूरची एसटी बस 48 तासांसाठी राहणार बंद
गेल्या महिन्याभरात बीड जिल्ह्यातील रूग्णसंख्या 603 टक्क्यांनी वाढली असून, मृत्यूदर हा 521 टक्क्यांनी वाढला आहे. सांगली जिल्ह्यात रूग्णसंख्या 543.2 टक्क्यांनी तर मृत्यूदर 632 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात मृत्यूंची संख्या 55 होती ती 403 वर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यात रूग्णसंख्येत 872 टक्क्यांनी तर मृत्यूदरात 223 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात नागपूरमध्ये 68 मृत्यूंची नोद झाली होती. तर ऑगस्टमध्ये हा आकडा 670 वर पोहोचला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्णसंख्येत 350 टक्क्यांनी तर मृत्यूदरात 120 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोल्हापुरात रूग्णांच्या संख्येत 402 टक्क्यांनी तर मृत्यूदरात 551 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोल्हापूरात रूग्णांचा आकडा वाढत असून, शनिवारी एका दिवसात 300 रूग्णांची भर पडली आहे.
ही बातमी वाचली का? राज्यात पावसाची दमदार बॅटींग’
सांगलीमध्ये गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत. काही रुग्णांलयांमध्ये कृत्रिम श्वसनयंत्रणा (व्हेंटीलेटर), अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधा उपलब्ध नाही. तर अनेक खासगी रूग्णालयांत कर्मचाऱ्यांना तुटवडा आहे. याशिवाय येथील रूग्णालयांत कोकणासह कर्नाटकातील अनेक रूग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्यावर ही उपचार करण्यात येत असून, मिरज कुपवाडा पालिकेने 125 खाटांचे जम्बो कोव्हिड केंद्र उभारले आहे. सरकारने सांगितलेल्या निर्देशांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून, मास्क किंवा सामाजिक अंतर राखत नसल्याचे पाहायला दिसून येत आहे.
- डॉ. रविंद्र ताटे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली-मिरज-कुपवाडा
ही बातमी वाचली का? डंख कोरोनाचा : महापालिकेसाठी झिजले, "कोरोना'त एकटेच लढून हरले
शहरांना कोरोना नियंत्रणात यश
राज्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड यांसारख्या शहरातील रूग्णालयात ग्रामीण भागातील गंभीर रूग्णांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात दाखल केले जात आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी 57 टक्के रूग्ण हे या शहरात असले तरी कोरोनाला नियंत्रणात या शहरांनी काही प्रमाणात यश मिळवले आहे. मुंबईत जुलै ते ऑगस्ट या कालावधीत रुग्णांच्या संख्येत 28.04 टक्के, ठाण्यात 43.08 टक्के तर पुण्यात 104.3 टक्के वाढ झाली आहे.
जिल्हा | रूग्णसंख्येतील वाढ | मृत्यू दरातील वाढ (टक्क्यांत) |
बीड | 603 | 521 |
सांगली | 543.2 | 632 |
कोल्हापूर | 402 | 551 |
नागपूर | 885 | 223 |
उस्मानाबाद | 350 | 120 |
----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
Web Title: Beed Sangli Kolhapur Osmanabad Nagpur Districts Number Patients Increased 400
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..