किरीट सोमय्यांना बीड दौऱ्याआधी व्हॉट्सअपवर धमकी; पोलिसांकडे तक्रार

पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे सोमय्यांची तक्रार
Kirit-Somaiya
Kirit-Somaiyasakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी ईडी (ED)कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच एफआयआरच्या पाठपुराव्यासाठी ते उद्या बीड (Beed) जिल्ह्यातील जगमित्र शुगर आणि बर्दापूर पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना व्हॉट्सअपवर धमकी आली आहे. अशी तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे केली आहे.

मुंडे यांच्या बीड येथील मालकीच्या जगमित्र साखर कारखान्याची शंभर कोटींची जमीन त्यांनी फसवणुकीने बळकावल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांच्या तक्रारीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधले आहे.

1988 मध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांचा अंगठा घेऊन 2010 मध्ये त्याची जमीन मुंडेंनी आपल्या नावावर करून घेतल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. याबाबच सोमय्यांनी याबाबतची काही कागपत्रे पुरावे म्हणून काही दिवसापुर्वी पत्रकार परिषदेत सादर केली होती. याबाबत मुंडे हे दोषी असून यांची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमके काय आहे जमीन प्रकरण ?

14 जुन 2019 मध्ये आंबेजोगाई तालुक्यातील बरदापूर गावी राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडेसह अन्य 13 जणांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 44 एकर 20 गुंठे जमिन बेलकुड़ी बुवा मठ संस्थानाचे मठपती महंत रणजीत व्यकागिरी यांना निजाम काळात इनाम म्हणुन बहाल करण्यात आली होती. या जमिनीची नोंद सरकारी जमिन अशी असून त्याचे मुळमालक ज्ञानोबा सिताराम कोळी हे होते. मुंडे यांनी 28 नोव्हेंबर 2010 ला त्यांच्या संमती पत्राद्वारे ती खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, ज्ञानोबा सिताराम कोळी यांचा मृत्यू सप्टेंबर 1988 मध्येच झाला होता. मग 2010 मध्ये त्यांच्या अंगठ्याने मुंडेंनी जमीनीची खेरदी कशी केली? असा सवाल सोमय्यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानोबा सिताराम कोळी यांचा मृत्यू झालेला असताना त्यांच्या अंगठ्याचा ठसा लावून मुंडे यांनी संमती पत्र घेतले याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, देवस्थानची जमीन स्वतःच्या जगमित्र शुगर मिलच्या नावाने करून घेत शासनाची दिशाभूल व फसवणूक करण्यात आली आहे. ही जमीन वर्ग-2 असताना शासकीय कर्मचाऱ्यांशी संगनमत करून एन.ए. लेआऊट करून घेतली, त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. त्याआधी मुंडेंना मंत्रीमंडळातून काढा, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com