Omicron : राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई, ठाण्यासह पुण्यातील शाळा बंद करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला आहे.
Students
Studentssakal

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी (Higher And Technical Education Minister Uday Samant) दिली आहे. राज्यतील विद्यापीठातील, महाविद्यालयातील परीक्षा या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असून, हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. (Maharashtra Collages Closed Till 15 Feb 2022)

Students
Precautionary कोरोना डोस कोणता मिळणार? आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

विद्यार्थांची सुरक्षितता महत्वाची आहे. बैठकीत कोरोना रूग्णांची आणि ओमिक्रॉन (Omicron Cases In Maharashtra) संख्येबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व अकृषि विद्यापीठे, विद्यापीठांशी संलग्नित विद्यापीठे. स्वयंम अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतनचे वर्ग 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण सुरू होते त्याच पद्धतीने सुरू राहिल अशी भूमीका सर्व विद्यापीठांनी घ्यावी असे सामंत यांनी यावेळी सांगितले. (Collage Online Exam )

Students
भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

दरम्यान, सर्व अकृषि विद्यापीठे, विद्यापीठांशी संलग्नित विद्यापीठे. स्वयंम अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतनशी संबंधित परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णयदेखील बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. याशिवाय महाविद्यालयांसोबतच वस्तीगृहेदेखील बंद (Collage Hostel Closed Due To Corona ) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Students
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटूंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय

कोरोनाचा वाढता कहर आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा धोका लक्षात घेता मुंबई, ठाणे, पुणे या शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे आणि ठाण्यामधील पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) प्रमुख आयएस चहल यांनी सांगितलंय की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 9 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com