

Girish Mahajan Reacts to Mumbai Morcha Controversy
Esakal
महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं भाजपकडून काढण्यात आलेल्या मोर्चावेळी एका महिलेनं ट्राफिक जाम झाल्यानं संताप व्यक्त केला. थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. तासभर वाहतूक कोंडी झाल्याचं म्हणत महिलेनं इथून चालते व्हा म्हटलं होतं. त्यावेळी महिलेनं पाण्याची बाटलीही आंदोलक महिलांच्या दिशेनं भिरकावली. या प्रकारावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. मोर्चामुळे ट्राफिक जाम झालं हे मान्य आहे पण मोर्चा महिलांसाठीच होता आणि महिलेनं ज्या पद्धतीनं वर्तन केलं ते योग्य नव्हतं. सौम्य भाषेत बोलू शकल्या असत्या असं गिरीश महाजन म्हणाले. Minister Mahajan Responds to Viral Video of Angry Woman