

Officials collecting household data using mobile devices as part of India’s first digital census 2026
esakal
India Census 2026 : देशात १५ वर्षांनंतर होणारी जनगणना म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ही जनगणना १ मेपासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे भारतातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीसोबतच मोबाइल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १ ते १५ मे या कालावधीत ज्यांना शक्य आहे ते स्वत:ची माहिती अधिकृत पोर्टलवर भरू शकतात. इतरांसाठी १६ मे पासून १४ जूनपर्यंत नेहमीच्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यातील जनगणना होणार आहे.