बुद्ध, जैन, बसवेश्वर यांनी आधी विद्रोह केला मग...; आव्हाडांची पवारांना पाठराखण

साताऱ्यात झालेल्या सभेत शरद पवारांनी जवाहर राठोड यांनी लिहिलेली पाथरवट ही कविता वाचून दाखवली.
Jitendra Awhad
Jitendra Awhad sakal media

मुंबई : शरद पवारांनी साताऱ्यातील पाथरवटात सादर केलेल्या कवितेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियालर व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पवारांच्या कवितेची पाठराखण केली आहे.

(Jitendra Awhad On Sharad Pawar Poem Trolling)

साताऱ्यात झालेल्या सभेत शरद पवारांनी जवाहर राठोड यांनी लिहिलेली पाथरवट ही कविता वाचून दाखवली. राठोड यांनी आपल्या कवितेत आम्हाला मंदीरात जाऊ न देणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. ते म्हणतात की, तुमच्या मंदीरात असलेले देव आम्ही घडवतो, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत असं त्यांनी कवितेत लिहिलं होतं. ते पवारांनी आपल्या भाषणादरम्यान वाचून दाखवलं होतं. दरम्यान जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, "विद्रोह हा पहिल्यांदा होत नाही, तो बुद्ध, जैन, बसवेश्वर यांनी आधी केला. त्यानंतर व्यवस्थेविरूद्ध विद्रोह करणं सुरू झालं आणि संतपरंपरा सुरू झाली." असं ते म्हणाले.

Jitendra Awhad
"जैसा राजा वैसी प्रजा": राहुल गांधीनंतर कॉंग्रेस नेत्यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल

"बाबासाहेब आंबेडकरांच्या आईला देवळात प्रवेश नकारला होता, त्यांना शाळेत बसून दिलं नाही अशा विद्रोही कविता महाराष्ट्राने ऐकायला पाहिजेत." असं म्हणत शोषित आणि वंचित समाजामागे आपण उभं राहिलं पाहिजे असं शरद पवारांच्या वक्तव्याचा आव्हाडांनी उल्लेख केला आहे. दरम्यान या कवितेत तुमच्या देवांना घडवणारे आम्ही देवाचे बाप आहोत असा उल्लेख असल्याने त्या कवितेवर आणि शरद पवारांवर टीका होत होती. पण त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, हा आधुनिक काळातील कवी आहे, व्यवस्थेशी बंडखोरी त्याच्या रक्तात आहे. आजही दलितांवरील अन्याय थांबलेले नाहीत असं म्हणत त्यांचे लिखाण वाचले की अस्वस्थ व्हायला होतं असं ते म्हणाले.

Jitendra Awhad
तृतीयपंथी स्वच्छतागृह प्रकरण; कोर्टाचा मनपा आयुक्त, महापौरांविरोधात अध्यादेश

"त्या कविने त्यांच्यावर आत्याचार करणाऱ्या व्यवस्थेविरोधात बंडखोरी केली आहे मग त्याच्याकडे बोट कसे दाखवता? त्याचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्या ह्रदयातील खंत त्याने शब्दातून व्यक्त केली आहे हे आपल्याला टोचलं पाहिजे. त्याचंच कौतुक शरद पवार यांनी केलंय." असं म्हणत आपण त्यांना नाव ठेवण्याऐवजी कौतुक केलं पाहिजे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com