
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचे गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केले आहेत. यात त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचा उल्लेखही केलाय. या ठिकाणी हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून कमी केली गेली असं गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते. आता राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर किती मतदारांची नावं नव्यानं समाविष्ट केली गेली आणि किती नावं कमी करण्यात आली याची आकडेवारी समोर आली आहे.