

राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. निवडणूकी प्रचारादरम्यान महायुती सरकारमधील प्रमुख पक्ष भाजपने वक्फ जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच वक्फ बोर्डावर अनेक नेते टीका करत होते, मात्र, निवडणूक निकालानंतर महायुती सरकारने तातडीने वक्फ बोर्डाचं कामकाज आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी निधी मंजूर केला आहे, त्यामुळे आता या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.