Sanjay Raut: 'वक्त जरूर बदलता है' शिंदे गटाच्या १६ आमदारांचं काय होणार? राऊतांचं सूचक ट्विट

कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी
Sanjay Raut
Sanjay RautEsakal

सध्या महाराष्ट्र, देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

Sanjay Raut
Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तरुणांना कोयता पुरवणाऱ्या दुकानदाराला अटक

या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधताना महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या वाक्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

Sanjay Raut
Shivsena News: व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सेनेच्या सत्ता संघर्षावर लागणार निकाल? कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी

दरम्यान सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी एक शेर ट्विट केले आहे. 'मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए... नसीब बदले या ना बदले,वक्त जरुर बदलता है', अशा मजकूराचा हा शेर आहे. कोर्टाकडून अपेक्षित अशा गोष्टी घडणार का हे पाहवं लागणार आहे.

मात्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे.

यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com