पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको- संजय राऊत

पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य राऊतांनी यावेळी केलं आहे.
 Sanjay Raut
Sanjay Raut esakal

राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं. तसेच, मुख्यमंत्र्याच्या दिल्ली दौऱ्यावरुनही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.(maharashtra politics crisis Sanjay Raut says change of government)

सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील असा विश्वासही संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यामांशी बोलताना व्यक्त केला आहे.

सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागलं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत. असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्यही राऊतांनी यावेळी केलं आहे.

 Sanjay Raut
मोदी सरकारच्या काळात ED च्या धाडी वाढल्या? अर्थमंत्र्यांनी संसदेत स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र, राज्यातील बैठकांमुळे शिंदे यांचा दौरा रद्द झाला. आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेचा हा पाचवा दौरा होता. या दिल्ली दौऱ्यावरुनही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलेे.

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीला यावं लागलं नाही. शिवसेनेचं हायकमांड कायम मुंबईत राहिलं आणि आता मुंबईतच चर्चा होत नाही. दिल्लीतील लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. युती करण्यासंदर्भात अमित शाहदेखील मातोश्रीवर आले होते. मित्रत्वाच्या नात्यातून या गोष्टी घडत होत्या. पाच वेळा मुख्यमंत्र्यांना यावं लागत असल्याने आता बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतात का असंही वाटू लागलं आहे खोचक टोलाही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे.

 Sanjay Raut
'प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार...' सेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप होऊ शकलेली नाही. एक महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरणे निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या एका महिन्यापासून खेळखंडोबा सुरु आहे. शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. असं यावेळी राऊत म्हणाले.

भाजपाला शिवसेना फोडायची होती आणि पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान होतं. त्यात त्यांना यश मिळत असलं तरी हे जास्त काळ टिकणार नाही. असही राऊत यावेळी म्हणाले.

 Sanjay Raut
शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही - अमोल मिटकरी

ईडीच्या कारवाई फक्त विरोधकांवरच होत असता. तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे. असा पुन्हा आरोप राऊतांनी यावेळी केला. भाजपच कारस्थान अधिक काळ चालणार नाही. असे अर्जुन खोतकारांच्या प्रामाणिपणाच राऊतांनी यावेळी कौतुक केलं.

ईडीचा दबाव असल्याचे खोतकरांनी मान्य केले. खोतकरांनी हिंदूत्वाला बदनाम केलं नाही. खोतकारांच्या प्रामाणिपणाच कौतुक करतो. असे राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com