Politics : दोघांत तिसरा की दुसऱ्याऐवजी तिसरा? अपरिहार्यता, संधी हाच संभाव्य समीकरणाचा पाया

devendra  Fadnavis, Ajit pawar, Amit Shah, Sharad Pawar and Eknath Shinde
devendra Fadnavis, Ajit pawar, Amit Shah, Sharad Pawar and Eknath Shinde

बीड : विद्यमान राजकीय परिस्थितीनुसार लोकसभेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे गणित जुळणे कठीण असल्याने राष्ट्रवादीला सत्तेत घेणे ही भाजपची अपरिहार्यता आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेच्या भीतीपोटी भाजपची साथ देणे जशी राष्ट्रवादीतील काही नेत्यांची अपरिहार्यता आहे तसे सत्तेत सहभाग मिळत असणे ही देखील राष्ट्रवादीसमोर मोठी संधी आहे.

ही अपरिहार्यता आणि संधीच राज्यातील संभाव्य राजकीय परिस्थितीचा पाया असल्याचे मानले जात आहे. सध्या घडत असलेल्या घडामोडी या त्याचीच एक स्क्रिप्ट असल्याची जाणकारांची माहिती आहे.

devendra  Fadnavis, Ajit pawar, Amit Shah, Sharad Pawar and Eknath Shinde
पक्षाध्यक्ष पदासाठी सुळे मात्र सर्वाधिक परिणाम ‘मविआ’वर; साम टीव्हीच्या कौल, राजकीय समीकरण बदलणार

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची तोडफोड करून राज्यातले सत्तेचे गणित जुळविले. मात्र, सद्यःस्थितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती, वज्रमूठ सभांना मिळणारा प्रतिसाद व सत्तेतल्या शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांची कमी होत असलेली क्रेझ भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.

त्यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे राज्यात गणित जुळणार नसल्याचा अहवाल भाजपमधीलच धुरिणांनी दिला आहे.

त्यामुळे राज्यात नवे समीकरण जुळविण्याचे सूत्र केंद्रातील नेत्यांनी हाती घेतले. त्यातूनच पंधरवड्यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या.

दरम्यान, याच काळात आजारी सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास मिशन (एनसीडीसी) मार्फत राज्य शासनाच्या हमीने आर्थिक मदतीच्या यादीत राष्ट्रवादीच्या व अजित पवार यांच्या समर्थक नेत्यांच्या पाच कारखान्यांचा समावेश, हा देखील याचाच भाग होता.

devendra  Fadnavis, Ajit pawar, Amit Shah, Sharad Pawar and Eknath Shinde
Sharad Pawar Resigns : सिल्व्हर ओकवरील बैठक संपली! शरद पवार काय म्हणाले? जयंत पाटलांनी दिली माहिती

मात्र, अजित पवार यांनी समर्थकांसह भाजपसोबत जाणे भाजपला नको आहे. तर, महाविकास आघाडीची स्थापनाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली असल्याने आघाडीला धोका अशी प्रतिमा श्री. पवार यांना नको आहे. म्हणूनच उद्योजक गौतम अदानींच्या ‘सिल्व्हर ओक’ला भेटीनंतर पुन्हा हालचाली थंडावल्या.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक यांचा अनुभव आणि इतर काही नेत्यांना ईडी, सीबीआयकडून नोटिसांचा दोरखंड केंद्रीय भाजपने राष्ट्रवादीभोवती गुंफला आहे. त्यातून निःश्वास टाकण्यासाठी सत्तेत वाटा अशी संधीही आहे. ही अपरिहार्यता आणि संधी याची मांडणी स्वपक्षातील नेत्यांनी श्री. पवार यांच्यापुढे केली, अशी चर्चा आहे.

त्यात राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे राजकारणापेक्षा व्यवसायही अधिक असून सदानंद सुळेंची देखील त्यांच्यासोबत हिस्सेदारी असू शकते. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांचा कलदेखील भाजपला साथ देण्याचाच आहे.

एकूणच पक्षातील काही प्रमुख नेत्यांची ही अपरिहार्यता आणि संधी पाहून पवार यांना निवृत्तीशिवाय पर्याय नसल्याचे निकटवर्तीय नेत्यांचे म्हणणे आहे. भविष्यात अजित पवार यांनी काही निर्णय घेतला तरी आपण अलिप्त असल्याचे ते सांगू शकतात, अशीही जाणकारांची माहिती आहे.

devendra  Fadnavis, Ajit pawar, Amit Shah, Sharad Pawar and Eknath Shinde
Amit Thackeray : राजकीय समीकरण बदलणार; 'राज'पुत्र अमित ठाकरे उदयनराजेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?

...म्हणून भाजपलाही नकोय पवारांची नाराजी

२०१९ च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ईडीची नोटीस आली तर खुद्द पवारच ईडीच्या कार्यालयात जाऊन बसले. राज्यात राजकीय धुराळा उडाला आणि राष्ट्रवादीच्या बाजूने वातावरण तयार झाले. पवारांकडून महाविकास आघाडीची मोट बांधली जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने पहाटेचा शपथविधी घेतला खरा; पण शरद पवारांनी हा डावही उलटून टाकला.

आताही लोकसभेच्या गणितासाठी महाराष्ट्रात भाजपला राष्ट्रवादीची गरज आहे. मात्र, अजित पवार आमदारांना घेऊन सोबत येण्यापेक्षा त्यांनाही शरद पवारांच्या मर्जीविना नको आहेत.

तसे घडले तर शरद पवारांमध्ये वातावरण ढवळून काढण्याची क्षमता असल्याने जुळणारे गणित बिघडण्याची पवारांमध्ये क्षमता असल्याची भाजपला भीती आहे. त्यामुळे पवारांच्याच मर्जीने किंवा त्यांची नाराजी नसेल असेच समीकरण भाजपला हवे आहे.

सध्या राज्यातील समीकरणात छोटा पक्ष असूनही भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतला समान वाटा दिला. सुरुवातीला सरकारबद्दल गवगवा झाला. मात्र, आता अंतर्गत ओढाताण तर सुरू झालीच असून सामान्यांमधील सरकार व मुख्यमंत्री शिंदेंची क्रेझही कमी होत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे वज्रमूठ सभांना प्रतिसाद आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती कायम आहे. त्यामुळे आता भाजपला राष्ट्रवादीची निकड आहे.

त्यामुळे समीकरणात अजित पवार आले तर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी एकाला केंद्र सरकारमध्ये मानाचे पान मिळू शकते. राष्ट्रवादीतून देखील एखादा नेता केंद्रात जाऊ शकतो. कदाचित अजित पवार यांना क्रमांक एकची खुर्चीही मिळू शकते, असेही जाणकार सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com